शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राष्ट्रवादीमधील आऊटगोर्इंगला ब्रेक , नगरसेवकांचा भाजप प्रवेश लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:57 IST

सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीअंतर्गत संजय बजाज व कमलाकर पाटील गटात संघर्ष उफाळून आल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यापर्यंत

ठळक मुद्दे: जयंतरावांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा परिपाक- अंतर्गत वादावर पडदा

-शीतल पाटील ।सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीअंतर्गत संजय बजाज व कमलाकर पाटील गटात संघर्ष उफाळून आल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले होते. पण आमदार जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच पक्षातील ‘आऊटगोर्इंग’ला बऱ्यापैकी ‘ब्रेक’ बसला आहे. उलट धनपाल खोत, इद्रिस नायकवडी यांच्यासारख्या दिग्गज आजी-माजी नगरसेवकांचे राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सुरू झाले आहे.

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगलीच्या ऐतिहासिक स्टेशन चौकात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार नुकताच झाला. या सत्काराच्या निमित्ताने भाजपच्या वाटेवर असलेले बहुतांश नगरसेवक यावेळी व्यासपीठावर होते. जयंतरावांनी त्यांचा नामोल्लेख केल्याने या नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रेमाला नव्याने भरती आली आहे. महिन्याभरापूर्वी महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीची परिस्थिती वाईट होती.

शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांना पदावरून हटविण्यासाठी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली १८ नगरसेवक व पदाधिकाºयांचा एक गट आक्रमक झाला होता. अगदी प्रदेश पातळीपर्यंत लेखी तक्रारी करण्यात आल्या. गटबाजीने पोखरलेल्या राष्ट्रवादीला जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदामुळे संजीवनी मिळाली आहे. सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीत मनोमीलनाचे वारे वाहू लागले आहे.

बºयाच महिन्यानंतर बजाज-पाटील गट एका व्यासपीठावर आले होते. या सत्कारापूर्वी हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने स्टेशन चौकातच राष्ट्रवादीची सभा झाली होती. त्या सभेपेक्षा जयंत पाटील यांच्या सत्काराला चांगली गर्दी होती. हल्लाबोलवेळी व्यासपीठावरील डिजिटल फलकावरूनही दोन्ही गटात वाद झाला होता. यावेळी मात्र डिजिटल फलकाची जबाबदारी कमलाकर पाटील यांनी घेतली होती. त्यामुळे अगदी किरकोळ कारणावरून सातत्याने होणाºया वादावर पडदा टाकला जात आहे. त्यात शहर जिल्हाध्यक्ष पदाचा वाद महापालिका निवडणुकीपर्यंत तरी बासनात गुंडाळण्यात आला आहे.एकूणच जयंतरावांच्या प्रदेशाध्यक्ष पदाने महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादीला नव्याने बाळसे येऊ लागले आहे.शहर जिल्हाध्यक्ष पदाचा निर्णय निवडणुकीनंतरमहापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत शहर जिल्हाध्यक्ष पदाचा वाद उफाळला होता. पण जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होताच दोन्ही गटाने या वादावर तात्पुरता पडदा टाकला आहे. महापालिकेच्या निवडणुकीवर वादाचा परिणाम होऊ नये, यासाठी कमलाकर पाटील गटाने ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. त्यातच दोन्ही गटांना दुखविणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही परवडणारे नाही. निवडणुकीनंतर या वादावर तोडगा काढण्याचा निर्णय झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.जयंतरावांचा : पायगुणधनंजय मुंडे यांनीही जयंतरावांचा पायगुण चांगला असल्याचे वक्तव्य केले. त्याची प्रचिती महापालिका हद्दीत येऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी कुपवाडचे नेते धनपाल खोत यांनी भाजपला रामराम ठोकला. ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जाहीर चर्चा आहे. तसेच मिरजेचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्याशी जयंतरावांनी जमवून घेतले आहे. त्यामुळे मिरजेतील संघर्ष समितीचा बेत रद्द करून तेही राष्ट्रवादीच्या चिन्हावर मैदानात उतरू शकतात. नायकवडी पक्षात आल्यास राष्ट्रवादीला मिरजेत चांगलेच बळ मिळणार आहे. त्यामुळे मिरजेत भाजप प्रवेश करणाºया नगरसेवकांची कोंडी होईल. 

महापालिका क्षेत्रात भाजपला मोठा जनाधार नाही. केंद्र व राज्यातील भाजपच्या कारभाराविरोधात लाट निर्माण झाली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर त्यांची भिस्त होती. पण जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाल्याने सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आहे. परिणामी एकही नगरसेवक भाजपमध्ये जाणार नाही. उलट नजीकच्या काळात राष्ट्रवादीतच इनकमिंग वाढणार आहे. काँग्रेस व समविचारी पक्षांसोबत आघाडीचा निर्णय जयंत पाटील हेच घेतील. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल.- कमलाकर पाटील, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्षमहापालिकेची आगामी निवडणूक राष्ट्रवादीने स्वबळावर लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जयंत पाटील व प्रदेश नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावना सांगितल्या आहेत. सध्या देशातील वातावरण पाहता, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेससह समविचारी पक्षांची आघाडी करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या भूमिकेला महापालिकेची निवडणूक अपवाद ठरेल, असा आग्रह आमचा राहणार नाही. जयंत पाटील जो आदेश देतील, त्यानुसार आम्ही एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाऊ. - संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण